शहरात वाहतुक कोंडी वाढत चालली असून या कडे संबधीत विभागाने लक्ष देण्याची गरज

0
313

 

प्रशासनाने लाॅकडाऊन जरी केले असून आर्णी शहराला सकाळी 09 ते दुपारी 02 वाजेपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे सकाळी 09 वाजता पासूनच शहरातील नागरीक मार्केटकडे एकाच वेळी धाव घेतात शहरातील मेन रोड, माहुर चौक, बस स्टॅन्ड चौक, उत्तम टाॅकीज रोड, सराफा मार्केट, माहुर रोड येथिल रस्ते पुर्ण पणे जाम होतात. कोरोनाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे असे असले तरी वाहतुक कोंडी तसेच कोरोना पार्श्वभूमीत बाजारात होणारी गर्दी विचार करायला लावणारी आहे वेळ कमी असल्याने नागरीक किराणा दुकान, दुध डेअरी, भाजीपाला दुकान, पेट्रोल पंप, वाईन शाॅप, मटका काऊंटर, बॅकेत नागरीक तौबा गर्दी करतांना दिसून येत आहे त्यामुळे नागरीकांनी व प्रशासनाने जिल्हाधिकारी यांचे सर्व नियम व आदेश धाब्यावर बसवले असे पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here