महिलांच्या हक्कांचे व्यासपीठाचे ४थ्या वर्षात थाटात पदार्पण

0
593

महिलांच्या हक्कांचे व्यासपीठाचे ४थ्या वर्षात थाटात पदार्पण

सहज सुचलवर महाराष्ट्रातील अनेक लेखिका व कवयित्रिंचा समावेश 

🟡चंद्रपूर🌀🛑किरण घाटे🟣🟡 विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणां-या सहज सुचल या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाने आपली यशस्विरित्या तीन वर्ष पूर्ण करुन एक जानेवारीला अर्थात आज नववर्षात ४थ्या वर्षात थाटात पदार्पण केले आहे
🌀🟢🟡🟣नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठ व त्या साेबतच *काव्यकुंज* ग्रुपची निर्मिती करण्यांत ख-या अर्थाने राजूरा निवासी वैदर्भिय सुपरिचित जेष्ठ लेखिका , काव्य रचनाकार,शिक्षिका अधिवक्ता मेघा धाेटे व चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा येथील प्रगतिशील महिला कास्तकार ,सामाजिक कार्यकर्त्या राजुरा याेग पतंजलीच्या साेशल मीडीया प्रमुख मायाताई काेसरे यांचे श्रेय व सिंहाचा वाटा आहे.🟣💠🌼🟡या गृपच्या माध्यमातून महिलांना एक मानाचे आणि सन्मानाचे व्यासपीठ निर्माण झाले त्यात महाराष्ट्रातील शेकडाें प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिंका तसेच नवोदित कवयित्रींचा समावेश आहे.त्या नित्य आपल्या काव्य रचना सादर करीत असतात.समाजातील वास्तव ,अनिष्ट चालीरीती,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता अशा अनेक ज्वलंत विषयांवर या साहित्यिकांचे नित्यनेमाने उत्तम लेखन घडत असते .या ग्रूपच्या माध्यंमातुन समाज परिवर्तनाचे महान कार्य देखिल घडत असुन सोबतच महिलांचा आत्मविश्वास व त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणिव झाली आहे . 🛑🟡🟣💠🟢घर ,चूल आणि मूल एवढेच क्षेत्र आता मर्यादित राहिले नसून ती मुक्तपणे वावरू पाहते आहे .🟢💠🌀या व्यासपीठाला पुढे नेण्यांचे श्रेय मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे ,विजया भांगे ,स्मिता बांडगे , रजनी रनदिवे , सुविधा बांबाेडे विजया तत्वादी जास्मिन शेख , रसिका ढाेणे कविता चाफले , ज्याेति मेहरकुरे , सराेज हिवरे , प्रतिभा चट्टे , पूनम रामटेके, प्रांजली दुधे लता निंदेकर यांचे अाहे . 🟡🟪☀️🟢💠या व्यासपिठावर सदैव कार्यरत असणां-या सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील रहिवासी तथा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणां-या प्रख्यात कवयित्रि जागतिक पुरस्कार विजेता कु.अर्चना सुतार यांनी काेराेनाच्या महाभयानक काळात तब्बल शंभर काव्य रचना लिहुन जगभर जनजाग्रूतीचे महान कार्य केले आहे .त्यांना आज पावेताे अनेक पुरस्कार व सन्मान पत्र प्राप्त झाले आहे .या शिवाय याच व्यासपिठावरील नागपूर जिल्ह्यातील कन्हानच्या मेकअप आर्टीस्ट कु.कल्यानी सराेदे यांनी दाेन माेठे पुरस्कार मिळवून सहज सुचल साेबतच कल्यानीने आपल्या गावाचे नाव राेशन केले आहे .🟢💠🟩🛑🟣नवाेदितांच्या कला गुणांना वाव देणां-या व सामाजिक क्षेत्रात सदासर्वदा उल्लेखनिय कामगिरी करणां-या चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील या लाेकप्रिय ग्रुपवर सामाजिक कार्यात सातत्याने अग्रकमी असणां-या डाँ .अंजली साळवे , डाँ .स्मिता मेहेत्रे वंदना ढवळे , अर्जुमन शेख , वंदना आगरकाठे , रक्षा नगराळे , प्रतिभा नंदेश्वर , सुवर्णा कुळमेथे , नयना झाडे ,कुसुम अलाम , श्रूती उरानकर,भाग्यश्री हांडे , रजनी पाेयाम , शुभांगी डाेंगरवार, मेघा भांडारकर, वर्षा शेंडे प्रतीक्षा झाडे व इत्तर महिला सदस्यांचा प्रामुख्याने सामवेश आहे .💠🟣🛑🟪🟡🔶सहज सुचलच्या वर्धापन दिना निमित्त सामाजिक व साहित्य क्षेत्रातील अनेक मंडळीनी अधिवक्ता मेघा धाेटे व मायाताई काेसरे यांना या दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here