वरुर रोड येथे २०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या…

0
413

वरुर रोड येथे २०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या…

राजुरा । राहुल थोरात

राजुरा तालुक्यातील वरुर रोड या गावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी २०० घरांवर पाट्या लावल्या गेल्या आहेत. गावातील तरुण मंडळी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली. त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षणासाठी २६ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या ओबीसींच्या विशाल मोर्चात सहभागी होण्यासाठी गावात घरोघरी फिरून तरुण युवकांनी जागृती करून मोर्चात येण्यासाठी आवाहन केले. ठीक – ठिकाणी दुकानावर , चौकात , ओटो यावर बॅनर लावण्यात आले.


गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज‌ हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय उदाहरणार्थ शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठीच वरुर रोड येथील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती.
यांत राजेश आस्वले, प्रवीण चौधरी, विशाल शेंडे, अमोल धानोरकर,राकेश लांडे, साहिल चोथले,साहिल मडावी,प्रज्वल बोरकर,सुनील चोथले, लीलाधर आस्वले, अभिषेक वडस्कर,सुमित चोथले,यश बोरकूटे यासह गावातील इतर तरुणांनी, गावातील नागरिकांनी सहकार्य करून ही ओबीसी जागृती यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here