मानसिक आधारासाठी डायल करा हॅलो चांदा 155-398

0
360

हॅलो चांदाची हेल्पलाईन सोडवणार आता

नागरिकांच्या मानसिक समस्या

चंद्रपूर,दि.23 जुलै: जिल्ह्यामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हॅलो चांदा ही हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाइनला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन अग्रेसर ठरली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मानसिक समस्येचे उत्तर शोधण्यासाठी अर्थात नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. ही टेलिफोनिक कॉन्सिलिंग हॅलो चांदा 155- 398 या हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात येणार आहे. नागरिकांनी मानसिक समस्या सोडविण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे, आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

नागरिकांना मानसिक दडपण येऊ नये, ताणतणावाचे नियोजन याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. हॅलो चांदा 155-398 ‌या हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधून मानसिक आरोग्य संदर्भातील अडचणी दूर करता येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती विषयक आत्मभान अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गतच नागरिकांमध्ये असणारे मानसिक आरोग्य विषयीची समस्या, त्यांच्यामध्ये असणारी चिंता सोडविण्यासाठी  मानसिक आरोग्य विषयीची हेल्पलाइन अर्थात टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन आणि सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्यामध्ये टेलिफोनिक कॉन्सिलिंग संदर्भात परस्पर सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासोबत सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनिल साकुरे, प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे, प्राध्यापक डॉ.देवेंद्र बोरकुटे यांची प्रशिक्षित समुपदेशकांची चमू टेलिफोनिक कॉन्सिलिंगमध्ये काम बघणार आहे. सोबत मनःचिकित्सक डॉ.किरण देशपांडे, समुपदेशक मुग्धा कानगे यांचे सहकार्य राहणार आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या वाढत्या समस्यांचा विचार करता हॅलो चांदा या हेल्पलाईनची सुरूवात केली आहे. जेणे करून नागरीकांना आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्यांचे निवारण करता येईल.

नागरिकांमधील असणारी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी टेलिफोनिक कॉन्सिलिंग महत्वाची भूमिका बजावणार आहे. या टेलिफोनिक कॉन्सिलिंग करण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची चमू तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हॅलो चांदा 155-398 ‌ या हेल्पलाईन क्रमांकावर निसंकोचपणे आपल्या समस्या मांडा व समस्येचे निराकरण करण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.                       00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here