अखेर स्वतंत्र नळयोजना मागणीला यश… मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी घेतली दखल

0
365

अखेर स्वतंत्र नळयोजना मागणीला यश… मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी घेतली दखल

 

कोरपना/प्रवीण मेश्राम : चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील पस्तीस प्रादेशिक नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत 1996 ते 2001 या कालावधीत शेकडो गावांचा समावेश करून कोट्यावधी रुपये खर्च शासनामार्फत करण्यात आला मात्र अनेक गाव पाण्यासाठी तहानलेली होती याबाबत अनेक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे तक्रारी निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आले होते [ प्रादेशिक नळयोजनेच्या समाविष्ठ गावाना स्ववतंत्र नळ योजनेतुन मिळणार शुद्ध पाण्याचा अधिकार] प्रादेशिक योजनेची पाईपलाईन दहा ते पंधरा किलोमीटर लांब असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन तूट फूट व लिकेज मुळे व चुकीच्या पूर्वीच्या नियोजनामुळे योजनेचे स्वरुप घडाई पेक्षा मढाई अधिक एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था दोन दशक पाण्यासाठी नागरिकांना सहन करावी लागली यापूर्वी भारत निर्माण जलस्वराज अशा अनेक योजनेतून प्रादेशिक योजनेचे विभाजन योजनेतून गावे वगळणे व गाव तिथे स्वतंत्र बोरवेल किंवा विहिरी द्वारे योजना तयार करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांनी सातत्याने पाठपुरावा व निवेदने देऊन लक्ष वेधले ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळु भाऊ धानोरकर ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी . जि प चंद्रपूर यांच्याकडे जिल्ह्यातील व कोरपना तालुक्यातील प्रादेशिक नळ योजनेचे जीर्ण पाईप लाईन पाण्याची टाकी प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने अनेक गावातील योजना बंद अवस्थेत पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे अनेक ग्रामपंचायतीने सतत ठरावाद्वारे स्वतंत्र योजना कारण मीच करण्याची मागणी रास्त असल्याने कोरपना तालुक्यातील चार प्रादेशिक नळ योजनेमध्ये निमणी सोनुर्ली कोडशी कोठोडा यामध्ये ग्रामीण भागातील 34 गावाचा समावेश असून नियमित पाणीपुरवठा सुरळीत होत नाही अनेक गावे पाण्यासाठी भटकंती वंचित आहेत गाव पातळीवर पाणी स्त्रोत बळकट करून योजना तयार केल्यास गाव पातळीवरील योजना नियंत्रण वसुली देखभाल करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरतात व गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेत जीर्ण झालेल्या पाणी टाकी पाईप लाईन व निर्लेखित करण्याची गरज याबाबत आढावा घेऊन कुचकामी ठरत असलेल्या योजना तसेच प्रादेशिक नळ योजनेतून नावे वगळण्याची जिल्हाभरातील मागणी याबाबत संबंधितांना आढावा घेऊन वंचित असलेल्या गावांना जल जीवन मिशन अंतर्गत नियोजन आराखडा सर्वेक्षण याबाबत निर्देश देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना व नियोजन करण्याचे निर्देश दिल्याने संबंधित विभाग कामाला लागले असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता दराडे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सहाय्यक वैज्ञानिक दुबे तांत्रिक कार्यान्वयन यंत्रणेचे काळे पराते यांनी ग्रामीण भागातील गाव पातळीवर संपर्क पाहणी तसेच पिपरडा आसन या गावाला भेट देऊन सर्वेक्षण व पाणी स्त्रोतांची पाहणी करण्यात आली जल जीवन मिशन कार्यक्रमातून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे गाव पातळीवर अनेक दिवसाच्या मागणी पूर्णत्वाकडे जात असल्याचा उत्साह गाव पातळीवर दिसून येत आहे विशेषता ग्रामीण व आदिवासी भागातील प्रादेशिक नळ योजना अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत्या हे मात्र विशेष…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here