ठाणेदाराची अशी ही ‘गांधीगिरी’

0
662

ठाणेदाराची अशी ही ‘गांधीगिरी’

 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

सद्या गडचांदूर ते कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र, अनेकदा लक्ष वेधून ही याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. यावर गडचांदूर येथील ठाणेदार सत्यजित आमले यांनी गांधी जयंती निमित्त रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील, औद्योगिक शहर गडचांदूर ते कोरपना दरम्यान मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहे. २९ सप्टेंबरला खड्यामुळे तीन अपघात झाले. त्यात एकाला जीव ही गमवावा लागला. तसेच अनेकदा किरकोळ अपघात झाले. तरी मात्र बांधकाम विभाग यावर लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. यावर खुद्द ठाणेदारानी हे उचललेले पाऊल प्रशंसनीय ठरते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here