चिंचोली येथील शेतकऱ्याचे तीन बैल वीज पडून मृत्युमुखी

0
888

चिंचोली येथील शेतकऱ्याचे तीन बैल वीज पडून मृत्युमुखी

बेलगाव शेतशिवारातील घटना ; जवळपास दोन लाखांचे नुकसान

 

गडचांदूर/कोरपना (१ऑक्टो.) : आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या कडकडाटासह वीज पडून बेलगाव शेतशिवारात तीन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चिंचोली येथील शेतकरी बबन जुमनाके यांच्या मालकीचे हे तीन बैल असून एक बैल काही अंतरावर असल्याने सुदैवाने बचावला. यात जुमनाके यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सदर शेतकरी आपल्या शेतात बैल चारायला घेऊन गेले होते. बैल चरत असताना अचानक कडकडाट झाला. यात चरत असलेल्या बैलांवर वीज पडल्याने चार बैलापैकी तीन बैल जागीच ठार झाले तर एक बैल बचावला. या घटनेची माहिती तातडीने प्रशासकीय विभागाला देण्यात आली. आधीच अति पावसाने शेतकरी हवालदिल झाला असताना अचानक तीन बैलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यासमोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे. सदर नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला शासनाने तातडीने नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here