राष्ट्रीय काव्यांगण लेखणी साहित्य मंच व सामाजिक संस्थेच्या राज्य महासचिव पदी कवी प्रा. अभय दांडेकर यांची निवड
हिंगणघाट (वर्धा) :–अनंता वायसे तालुका प्रतिनिधी
देशातील व महाराष्ट्रातील साहित्यिकांना व्यक्त होण्याकरिता हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याकरिता कार्य करणाऱ्या राष्ट्रीय काव्यांगण लेखणी साहित्य मंच व सामाजिक संस्थेच्या राज्य महासचिव पदी कवी प्रा अभय दांडेकर यांची निवड करण्यात आली, महाराष्ट्रातील नवोदित लेखक कवी साहित्यिक यांना समाजातील घडामोडी व ज्वलंत प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणे व समाजमन प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याच्या दृष्टीने ऑगस्ट २०१९ पासून ही संस्था कार्यरत आहे, यावर्षी महाराष्ट्रात अनुभवी सहित्तिकांसोबतच नव्या दमाचे युवा लेखक कविंच्या साथीने ही लेखणी सर्वदूर पोहचावी या करिता कवी प्रा अभय दांडेकर यांच्या सहित्तिक प्रवासाचा व योगदानाचा विचार करून नियुक्ती करण्यात आली असे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजू पाडेकर यांनी सांगितले
या निवडीबद्दल प्रा अभय दांडेकर यांचे सर्व स्तरातूनअभिनंदन करण्यात येत आहे. निवड केल्याबद्दल राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजू पाडेकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नीरज आत्राम यांचे आभार मानून पुढील वाटचालीत सर्वांनी मार्गदर्शन व सहकार्य करावे हि अपेक्षा व्यक्त केली व नवीन कवी साहित्यिक लेखक यांनी सोबत जुळण्याचे आवाहन केले.