दारुचा सडवा चोरीच्या संशयावरून दोन युवकास बेदम मारहाण
कुडे नांदगावातील घटना;पोलीसांत तक्रार दाखल
प्रतिनिधी ✍🏻राज जुनघरे
चंद्रपूर:- गोंडपिपरी तालुक्यातील धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडे नांदगावात एका लग्न समारंभात दारुचा सडवा चोरल्याचा आरोप करत पाच युवकांनी दोघांना बेदम मारहान केली. सदर घटना काल सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरनी धाबा पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगावात रविंद्र चंद्रागडे यांच्या मुलीचे दि.१६ जुन ला विवाह होता. यावेळी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान अन्नाजी नानाजी कोडापे (२५) याने जेवन करण्यासाठी विवाह मंडपी गेला. तेव्हा भारत चंद्रागडे,प्रीतम तावाडे,प्रविन तावाडे,केशव तावाडे,प्रेमचंद तावाडे अन्नाजीनेच आपला दारुचा सडवा चोरला असल्याचा आरोप करत वरील पाचही जणांनी बेद्दम मारहान करत होते. यावेळी अश्विन मोरेश्वर सोयाम याने भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही बेद्दम मारहान करण्यात आले. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले असून ग्रामीण रुग्नालय गोंडपिपरी येथे उपचार घेत आहेत.सदर घटनेची तक्रार धाबा पोलीसांत दाखल केली असून पुढील तपास ठाणेदार सुशिल धोपटे करित आहेत. गैरअर्जदार भारत चंद्रागडे हा चोर मार्गाने दारुचा व्यवसाय करतो. यापूर्वी त्याच्यावर या – ना त्या कारणाने अनेक गुन्हे दाखल आहेत. गावात दुफळी माजऊन गटा तटात दहशत पसरवितो. व प्रीतम तावाडे, प्रविन तावाडे,केशव तावाडे,प्रेमचंद तावाडे यांनी त्याला मदत करतात. असाही आरोप अन्नाजी कोडापे यांनी केला आहे.
रविंद्र चंद्रागडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी सायंकाळला जेवनासाठी त्यांच्या घरी गेलो. यावेळी भारत चंद्रागडे यांनी तु माझे मोहाचा सडवा असलेले मडके चोरुन नेला म्हणून अचानक हल्ला चढवला. आणि बेदम मारहान केला. तेव्हा अश्विन सोयाम याने मला सोडविण्यासाठी आला असता ईतर पाचही जनांनी आम्हा दोघांनाही बेदम मारहान केले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्वाही करुन आम्हाला न्याय मीळऊन देन्याची मागणी अन्नाजी कोडापे व अश्विन सोयाम यांनी केली आहे.